महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(सातारा)
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर शेतीपूरक व्यवसाय दूधआणि दूध पावडर ला अनुदान मिळावे पाहिजे या साठी आंदोलन करण्यात आले
सातारा शहरात मा आ श्री छ शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सातारा नगरपालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले , जयदीप ठुसे, विट्ठल बलशेटवार, नगरसेवक अविनाश कदम,धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे,सौ प्राची शहाणे डॅनियल फरांदे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, माजी नगरसेवक किशोर पंडित , उपाध्यक्ष अप्पा कोरे , सौ मनीषा पांडे, चंदन घोडके ,चिटणीस रवी आपटे, संतोष प्रभुणे, लक्ष्मण चव्हाण , सौ वैशाली टंकसाळे,माजी शहराध्यक्ष सुनील काळेकर, महिला मोर्च्या अध्यक्ष सौ रीना भणगे , जिल्हा पदाधिकारी सौ सुनिशा शहा, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे,युवती मोर्च्या अध्यक्ष दीपिका झाड , वैद्यकीय आघाडी जिल्हा पदाधिकारी डॉ उत्कर्ष रेपाळ, अनु जाती मोर्च्या जिल्हा पदाधिकारी शैलेंद्र कांबळे,जेष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शहाणे , युवा मोर्च्यांचे अमोल कांबळे , किशोर गालफाडे, धीरज घाडगे,व्यापारी आघाडीचे जिल्हा पदाधिकारी डॉ सचिन साळुंखे, प्रशांत जोशी , औद्योगिक आघाडी अध्यक्ष रोहित साने , कामगार आघाडी अध्यक्ष तानाजी भणगे, अविनाश पवार,पदाधिकारी ,कार्यकर्ते,नागरीक, शेतकरी उपस्थित होते
सातारा शहरात श्री छ शिवाजी महाराज सर्कल आणि मोतीचौक या दोन्ही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले या वेळी
या वेळी खालील घोषणा द्याव्यात
- दूध उत्पादक शेतकरी उपाशी ठाकरे सरकार तुपाशी….
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ मिळालीच पाहिजे
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधावर अनुदान मिळाले पाहिजे
- दुधाला दहा रुपये अनुदान मिळालेच पाहिजे .
- दूध पावडर ला 50 रुपये अनुदान मिळालाच पाहिजे
- दुधाचे दहा रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले पाहिजे
- दूध पावडर चे पन्नास रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाला पाहिजे.
- दूध उत्पादक शेतकरी उपाशी ठाकरे सरकार तुपाशी.
किसान के सम्मान मे
भाजपा मैदान मे
या घोषणा देण्यात आल्या आणि हे सर्व लिहिलेले बोर्ड कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते
या वेळी बोलताना मा आ श्री छ शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की , भारतीय जनता पार्टी नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभी आहे ,दि २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना या बाबतचे निवेदन दिले होते , तसेच त्याची प्रत मा मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री महोदयांना पाठवली आहे , आज पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी या तीन चाकांच्या सरकारने कोणतेही काम केले नाही , शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे , दुधाला अनुदान देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे , या पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर मा विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष मा आ चंद्रकांतदादा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल,