महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
मौजे रेडणी(ता.इंदापूर)येथील गावताळ्यात मुरूम व दगड टाकून भरावा करून विट बांधकामाचे अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कारवाई करावी , या याबाबतची लेखी तक्रार इंदापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी विजकुमार परीट यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे .
या तक्रारींवर दोन दिवसात कारवाही न झाल्यास भारतीय स्वातंत्र्य दिनादिवशी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे .
मौजे रेडणी येथे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते , पाण्याची टँकर मिळण्याची खात्री नसल्याने पर्यायी मार्ग म्हणून पाटबंधारे विभागाची पाणी पट्टी भरून गाव तळ्यात पाणी सोडले जाते , व हा तलाव भरून घेतला जातो , या तलावात गावास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सार्वजनिक विहीर आहे , या विहिरीतूनच संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होतो , व गावकाऱ्यांची पाण्याची तहान भागविली जाते . हा गाव तलाव रेडणी गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे , संपूर्ण गावठाण , दलित वस्तीला या तलावातील पाण्याचा उपयोग होतो , अशीच तलावात अतिक्रमणे होत गेली तर या गावातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे , या तलावाचे खोलीकरण सकाळ रिलीफ फंडातून केले , तसेच ग्रामस्थांनी लोकसहभागातून तलावाचे खोलीकरण केले आहे , गावातील लोकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद होऊ नये , पाण्यासाठी त्यांच्यावर भटकंतीची वेळ येऊ नये यासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी या प्रकरणात गंभीर्याने लक्ष घालावे , हे बांधकाम जमीनदोस्त करावे , तसेच या तलावात टाकलेला सर्व मुरूम बाहेर काढावा , व पाणीसाठा होण्यासाठी तलाव खोली वाढवून द्यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करीत आहे .
या गाव तलावाच्या संरक्षणाची संपूर्ण जवाबदारी ग्रामपंचायत ची आहे,ग्रामसेवक हे या गावातील शासनाने प्रतिनिधी आहेत , ते ग्रामपंचायतचे सचिव आहेत , त्यांच्या विरोधात अतिक्रमणास अभय देत असल्याची तक्रार गटविकास अधिकारी वर्ग १ यांच्याकडे दाखल केली आहे , पण हे अधिकारी संबंधित ग्रामसेवकांचे जवळचे नातेवाईक असल्याने ते कोणती भुमिका घेतात हे महत्त्वाचे आहे दिवसा ढवळ्या या तलावात भरावा घालून अतिक्रमणे होत आहे , या कामावर सरपंच याचा जेसीबी व डम्पिंग चालू आहे , ही बाब दुदैवी असल्याची तक्रार पंचायत समिती व तहसीलदार यांच्याकडे दाखल झाली आहे .
गावातील सर्व अतिक्रमणे काढुन टाकण्याची जबाबदारी सरपंच , ग्रामसेवक , गावकामगार तलाठी यांची आहे , ग्रामसेवक व गावकामगार तलाठी या अतिक्रमणाकडे फिरकलेच नाहीत , अशा प्रकारे गाव प्रमुखांनी जर अतिक्रमणास अभय दिले तर आणखी अतिक्रमणे वाढणार आहेत , या गोष्टी रोखण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्षस्थळी भेट करणे गरजेचे आहे , परन्तु अतिक्रमणधारक , गावपुढारी यांच्याबरोबर आर्थिक हितसंबंध असल्याने ही कारवाही करण्यासाठी अधिकारी नेमकी काय कारवाई करतील याकडे पाहणे गरजेचे आहे .सदरील गाव तळे हे इंदापूर-रेडणी या मुख्य रस्त्यालगत आहे,साधारणता ५ ते ७ गुंठ्यांत गाव तलावात भरावा घालून विट बांधकाम चालू आहे , त्यामुळेच तलाव बुजनार आहे , आणि गाव तळ्यातील पाणी साठा कमी होणार असल्याने रेडणीचे ग्रामस्थ काळजीत पडले आहेत .
रेडणी गावातील या तलावात अतिक्रमणे करून तलावच नष्ट करायचा असे षडयंत्र आहे , या तलावात भरावा करण्यासाठी ज्या जेसीबी व टक्ट्ररने हा मुरूम आणला त्याची “रॉयल्टी”भरली का , व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यासाठी तहसीलदार सोनाली मेटकरी व गटविकास अधिकारी विजयकुमार परीट काय निर्णय घेतात ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे