नवारस्ता प्रतिनिधी : ऐक्यभाव राखला तर कोणत्याही प्रकारचे नक्कीच यश खेचुन आणता येईल. तेव्हा आपापसातले मतभेदास तिलांजली दिली पाहिजे. त्यासाठी सर्व बहुजन समाजघटकांनी एकत्र आले पाहिजे. असे आवाहन वंचित पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पाटण येथे बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते कालकथित पहिले बौद्धाचार्य गणपत भंडारे यांना सर्वपक्षीय आदरांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला, तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत खंडाईत मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे होते. खंडाईत आप्पा म्हणाले, “जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संधी पाटण तालुक्यात दिसत आहे. तेव्हा धार्मिक, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील मतभेद दूर ठेवावेत. सर्वांगीण समाज निर्माण करावयाचा असेल तर विशालदृष्टिकोन ठेवला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने यश खेचुन आणता येईल. आगामी सर्वच निवडणुकांत सामुदायिक लढण्यासाठी आतापासूनच सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी वारंवार एकत्रीत येऊन नियोजन केले पाहिजे. भंडारे भाऊंनी ज्या प्रकारे धार्मिकतेचे बीज पेरले होते त्याच प्रमाणे धम्माचे काम तालुक्यात विस्तारलेले आहे. तेव्हा धम्माबरोबरच राजकारण हातात हात घालुन केले पाहीजे. तरच डॉ.आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज निर्माण होईल.” जि. प. माजी सदस्य बापूराव जाधव म्हणाले, “भंडारेभाऊ यांचे सारखे समाजधुरिणी निर्माण झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्याची पोकळी भरून काढण्यासाठी सर्वानी संघटित होऊन पुढे आले पाहिजे.” अरुण देवकांत म्हणाले, “भाऊंचा सहवास हा धम्माच्या परिस स्पर्शासारखा होता.” जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष आबासाहेब भोळे म्हणाले, “धम्माची मशाल भाऊंनी पेटवून दिलेली आहे. ती विझता कामा नये. यासाठीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.” आरपीआय प.महाराष्ट्र सचिव प्रा.रवींद्र सोनवले म्हणाले, “भंडारे भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले होते. गावगाड्याबरोबर काम करून सर्व क्षेत्रात त्यांनी न्याय मिळवुन दिला.
संघर्ष करीत करीत जी धम्म चळवळ उभारली आहे त्यास तडा जाऊ देऊ नये. असेच कार्य करूया. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे निधन भीमगित गाता गाता झाले होते. त्याचप्रमाणे बुद्ध पौर्णिमेदिवशीच भंडारे भाऊंना मरण येणे म्हणजे धम्माच्या कार्याची मिळालेली पावतीच होय.” वंचितचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगताप म्हणाले, “भंडारे भाऊंनी मुंबई सोडून धम्माचा अभ्यास केला होता. त्यामुळेच संपूर्ण हयात त्यांनी धम्म कार्य करण्यात योगदान दिले.” आनंदा दाभाडे म्हणाले, “धम्मदानाची अपेक्षा न करता बौद्धाचार्य म्हणून त्यांनी हयातभर कार्य केले.” मुख्याध्यापक सुनील माने म्हणाले, “भाऊसारखे जीवन असावे. ते जरी मावळले असले तरी उगवत्या सुर्याना दिशा दिली आहे. त्यामुळे धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यास मदत होईल.” माजी केंद्रप्रमुख गौतम माने म्हणाले, “भंडारे भाऊ बौद्धाचार्य झाल्यानंतर अविरत असे कार्य केले.” बौद्धाचार्य विजयकुमार गायकवाड म्हणाले, “राजगृहासमोर भाऊंनी धम्म दीक्षा द्या.अशी मागणी केली होती. त्याच प्रेरणेने अधिकृत बौद्धांचार्य झाल्यानंतर सुमारे ३१ वर्षे त्यांनी कार्य केले. न्यादानाचेही कार्यही भाऊंनी चांगल्याप्रकारे केले. त्यामुळे वारासदारांची संख्येत वाढ झाली पाहिजे.” मंगल माने म्हणाल्या, “धम्मदीक्षा मिळाल्यानंतर धम्म चळवळ चालू झाली. भाऊंनी तर संपूर्ण तालुका पिंजून काढुन धम्माचे कार्य आदर्शवत केले.” डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अभ्यासू व आक्रमक धडाडणारी तोफ भीमराव दाभाडे यांनी सर्वस्पर्शी तालुक्याचा आढावा घेऊन आगामी काळात एक होऊन अनेक प्रलंबित कामे करून घेऊया अशी विस्तृत माहिती देऊन साद दिली.
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले, “धम्माचे कार्य अखंडित ठेवण्यासाठी सर्वप्रकारच्या संघटनानांनी एक होऊन साह्य केले पाहीजे. राजकीय, धार्मिक, सामाजिक आदी संघटनांनी आपापल्या पद्धतीने कार्य करावे. मात्र धम्म चळवळ अधिक गतिमान करणे व समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धम्म म्हणून एकत्र आले पाहीजे.” अध्यक्षस्थानावरून बोलताना बंधुत्वरत्न मिलिंद कांबळे म्हणाले, “तालुक्यात सर्वत्र विविधता आहे. तरीसुद्धा समाजाच्या उद्धारासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.” यावेळी बंधुत्व पाटणभूषण दयानंद जगताप, ऍड.संदीप कांबळे, बबनराव कांबळे, सिद्धार्थ सत्वधीर, शुभम उबाळे, दीपक माने, कैलास चव्हाण आदींचीही भाषणे समयोचित अशीच झाली. भारतीय बौद्ध महासभेचे सचिव रुपेश माने यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास महेंद्र दाभाडे, पांडुरंग भंडारे, नंदकुमार देवकांत आदी विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक – उपासिका उपस्थित होते.
महापुरुष व भंडारे भाऊ अभिवादनप्रसंगी मान्यवर.