बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा मोठा भाग आहे. त्यामुळे जनावरांच्या संगोपनासाठी व पूरक चाऱ्यासाठी काऱ्हाटी येथे कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जनावरांच्या संगोपनासाठी व दुधाच्या उत्पादन वाढीस चारा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यां ऐश्वर्या पवार, स्नेहल लोणकर यांनी या समस्येवर चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी निकृष्ट चाऱ्यापासून पौष्टिक व सकस चारा बनवण्यासाठी युरिया प्रक्रिया या प्रणालीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी निलेश चांदगुडे,सुनिता चांदगुडे, अरुणा चांदगुडे, आनंद चांदगुडे, आदी शेतकरी उपस्थित होते.