महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
दि.४/१२/२०२०
साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी गतवर्षी एन सी एल टी च्या माध्यमातून न्यू फलटण शुगर वर्क्स लि. हा कारखाना विकत घेतला व अल्पावधीत सन २०१९/२० चा गाळप हंगाम यशस्वी गाळप करून सन २०२०/२१ चा गाळप हंगाम सुद्धा जोमात सुरू केला आहे. आज अखेर कारखान्याने ९०,८३३ मे. टन गाळप केले असून९३,६७० क्विंटल साखर उत्पादित केली आहे सरासरी उतारा १०.७५ आहे. कारखान्याची एफ आर पी रुपये २५७९ असून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रुपये२५९२ नुसार रक्कम वर्ग केली आहे.
१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२० या पहिल्या पंधरवड्यात गाळपास आलेल्या ३८,६९१ मे टन ऊसाची रक्कम रुपये१०,०२,८६,७६७/ (दहा कोटी दोन लाख शाह्येंशी हजार सातशे सदुसष्ट) इतकी रक्कम दि २/१२/२०२० रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. इतर कारखान्याच्या तुलनेत दराबाबत कारखाना कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे आपला ऊस शेतकऱ्यांनी कारखान्यास द्यावा असे आव्हान श्री दत्त इंडिया कारखाना प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.