बरड : केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय हायवे प्राधिकरण यांचेमार्फत श्री नितिन गडकरी यांचे संकल्पनेतून साकारला जाणारा आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग चे नुकसान भरपाई वाटप भूसंपादन अधिकारी क्रमांक 16, यांचेमार्फत संबंधित जमीन बाधित शेतकरी संपादन जमिनीचे संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्याचे काम सध्या चालू आहे, ज्या संपादन जमिनीमध्ये हरकती आहेत त्याची सुनावणी भूसंपादन अधिकारी सतीश धुमाळ यांचे समोर सुरू आहेत सदर सतीश धुमाळ हे सुनावणी झाल्यानंतर त्यामध्ये आदेश न करता तडजोड करण्यासाठी संबंधितांना बळजबरी करत आहेत, असाच एक प्रकार मौजे बरड येथील एका प्रकरणामध्ये त्यांनी केलेला दिसून येत आहे.
सदर प्रकरणाची नुकसान भरपाई रक्कम साडेचार कोटी असून त्यामध्ये हरकत अर्जदार यांना चार टक्के व सतीश धुमाळ यांना चार टक्के रक्कम देणेबाबत सतीश धुमाळ यांनी संबंधित जमीन बाधित शेतकरी यांच्यावर खाजगी एजंटच्या मार्फत दबाव टाकलेला आहे त्यामुळे सदर प्रकरणाची बरड मध्ये दबक्या आवाजात मध्ये चर्चा सुरू आहे त्यामुळे केंद्र शासनाचे नुकसानभरपाई संबंधितांना वाटप करण्याऐवजी ती स्वतःच्या खिशातील रक्कम दिल्यासारखे सतीश धुमाळ वागत आहेत व ते सेटलमेंट करून टक्केवारी मध्ये नुकसान भरपाई लवकर देणेसाठी पैसे बेकायदेशीरपणे लाच प्रकारातून मागत आहेत, त्यामुळे नुकसान भरपाई वाटप कामात दिरंगाई होत आहे व त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर ती शेतकरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काम करण्यास मज्जाव करत आहेत, याची व इतर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आळंदी पंढरपूर पालखी मार्गातील शेतकऱ्यांकडून होत आहे याबाबत श्री नितिन गडकरी व संबंधित अधिकारी यांना भेटून याबाबत संबंधित शेतकरी चर्चा करणार आहेत.