म्हसवड : बारा वर्षात माण खटावच्या जनतेला रेटून खोट बोलून लबाडीचे धंदे करुन होणारी तरी हातमिळवणी करुन सत्ता मिळवाची आणि विकासाच्या स्वप्नाची हारणे दाखण्याचे उद्योग व सवंग प्रसिध्देसाठी भडक बोलून प्रसिद्धी मिळवायची हे जनतेने ओळखले आहे तुम्ही दहिवडी नगरपंचायतीच्या प्रभाग ६ व १४ मधील अवस्था पाहून अस्वस्थ होतंय. सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरलीय. तर पिण्याचे पाणी वेळेत मिळत नाही अन मिळाले तर ते शुध्द आहे याची खात्री देता येत नाही. आपले लोकप्रतीनिधी स्वतःच्या कौतुकाचे गोडवे स्वतः गातात. फक्त लबाडी करण्याशिवाय त्यांना आजपर्यंत काही जमले नाही कारण त्यांना शहरात पाणी देता आले नाही. त्यांना नगराध्यक्ष पदाची संगीतखुर्ची करण्याशिवाय अन त्यासाठी शिंगणापूर मध्ये शपथविधी करण्याशिवाय काही जमले नाही. नगरपंचायतीचा अनागोंदी कारभार हे त्यांच्या निष्क्रियतेचा ढळढळीत पुरावा आहे. पाणी, रस्ता, गटार यांची अवस्था दयनीय आसल्याचे प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथे प्रचारा दरम्यान व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माण खटावचे नेते प्रभाकर देशमुखासह सुनील पोळ राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, दादासाहेब जाधव, साईनाथ जाधव, मा. नगरसेवक अजित पवार इत्यादी उपस्थित होते.. पुढे प्रभाकर देशमुख म्हणाले आपले लोकप्रतिनिधी सध्या कायपण बरळत आहेत त्यांनी एकतानगर मध्ये जावून पाहावं लोक कसे जगत आहेत. कशासाठी आहेत हे लोकप्रतिनिधी व असे नगरसेवक? त्यामुळे बदल हा निश्चित आहे.शेकडो तरुणांची आयुष्य उध्वस्त करणाऱ्यांच्या पाठीमागे राहायचं की विकासाची दृष्टी असणाऱ्यांच्या?सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं. कुठे आहे तो पुतळा? अहंकारातून बरळणार्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. दहिवडी खऱ्या अर्थाने डिजिटल व स्मार्ट दहिवडी करण्याचा आम्ही संकल्प केला आहे.काहींना वाटतंय कोविडमध्ये फक्त आम्हीच काम केलं. जरा गोंदवलेसह संपुर्ण माण-खटाव मधील जनतेसाठी आम्ही केलेल्या कामाची माहिती नागरिकांकडून घ्या. ना मला डायबिटीस आहे ना इतर आजार आम्ही शरद पवार यांचे चेले आहोत आमची काळजी तुम्ही करु नका. कोल्हेकुईकडे दुर्लक्ष करुन विकासावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. तरुणांच्या पंखांना बळ देण्याचं काम करु.झोपडपट्टी विकासाचे एकही काम अथवा प्रस्ताव करण्यात आला नाही. तो जर झाला असता तर प्रत्येकाला घर मिळाले असते.
सुनिल पोळ म्हणाले विकासापासून वंचित असलेला हा प्रभाग शहराचा भाग न वाटता वाडीवस्ती असल्यासारखा वाटला. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी पुर्णपणे या भागाकडे दुर्लक्ष केले. हा विकासाचा बॅकलाॅग भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा.
सुखदेव कुंभार म्हणाले प्रभागातीलच उमेदवार निवडून द्या. कारण या प्रभागाचा प्रतिनिधी मागील पाच वर्षात दिसलाच नाही. रस्त्यावरील खांबावरील साधा बल्ब लावताना वर्गणी काढावी लागली याचा विचार करा. त्यामुळे इथल्या नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आपला माणूस असलेला राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून द्या. असे आव्हान केले.यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ,दादासाहेब जाधव, साईनाथ जाधव, मा. नगरसेवक अजित पवार इत्यादी उपस्थित होते..
मी म्हणजेच सरकार समजणाऱ्यांनी अहंकारातून बाहेर यावे. जनता हुशार आहे. खोटे बोलून स्वतःची पाठ थापटून घेणाऱ्या लोकप्रतिनिधीला जनताच जागा दाखवेल असा टोलाही प्रभाकर देशमुख यांनी लगावला..