सातारा जि.प . मध्ये सध्या गाजतेय ते वर्षानु वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कर्मचारी व बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या . याबाबत कास्ट्राईब आक्रमक पवित्रा घेतल्या मुळे नाईलाजस्तव ज्ञानेश्वर खिलारी ( Ceo ) यांना नाईलाजस्तव सर्व खातेप्रमुखाना दि ३१ /१/२३ रोजी स्पष्ट सुचना दिल्या की सर्व प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करा व प्रतिनियुक्तीचे नवीन प्रस्ताव पाठवू नका . सदरच्या आदेशा नंतर हे महाशय कलेक्टर शीप च्या ट्रेनिग साठी मसुरीला गेले , व चार्ज अँडीशनल Ceo श्री घुले यांचे कडे गेला मात्र त्यांना निर्णय घेण्यास स्वायत्य नव्हते . रोजचा अहवाल प्रशासक श्री . खिलारी (जि प चे मालक ) यांना देण्यात यायचा व त्यांनंतर त्यांचा ग्रीन सिग्नल आल्या शिवाय श्री घुले साहेबांना निर्णय घेता येत नव्हता . जि प चे मालक या अर्विभावात असणारे श्री ज्ञानेश्वर खिलारी १ महिन्याचे प्रशिक्षण घेवून आले मात्र त्यांच्या ३१/१/ २३ च्या आदेशाला खाते प्रमुखांनी पद्धतशीर कोलदांडा देऊन बऱ्याच प्रतिनियुक्त्या जैसे थे आहेत . श्री खिलारी यांचा तो आदेश व त्यावर न झालेली कारवाई म्हणजे ” नाक कापले तरी भोक शाबुत आहे ” अशी गत आहे . एकुणच काय तर वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तसेच बेकायदेशीर प्रतिनियुक्तीला जि .प . मालकांचे अभयच आहे . बघु या वर्षीच्या बदली धोरणात जिल्हा मुख्यालयी काम करणाऱ्या कर्मच्यांऱ्यांच्या दुसऱ्या तालुक्यात बदल्या होतात की हे बदली धोरण नसुन अधिकाऱ्याच्या मर्जीतील कर्मच्या ऱ्यांची सोय व बाकीच्यांची गैरसोय . बेकायदेशीर प्रतिनियुक्ती बाबतीत जि प मध्ये गमतीशीर प्रकार पहायला मिळालेत – जसे की दोघांत एक बायको तसे दोन कर्मच्यार्यात एक चौकशीचे टेबल सदर बाबत संघटनेची तक्रार झाल्यानंतर चौकशी टेबल एकाच कर्मच्याऱ्याकडे देण्यात आले . मात्र खिलारी महाशयांनी त्या कर्मच्या ऱ्यावर कोणतीही कारवाई केली नाही किंवा तो कर्मचारी कोणाच्या लेखी अथवा तोंडी सांगण्यावरून चौकशी टेबल सांभाळत होत त्या टेबलला काय गोळा करण्यासाठी दुसऱ्या कर्मच्याऱ्यांची नेमणुक होती काय ? असा ही प्रश्न उपस्थित होतोय . ज्या अख्याईके प्रमाणे ज्ञानेश्वरांने भिंत चालवली होती त्याप्रमाणे हा ज्ञानेश्वर काय करणार हा ज्वलंत प्रश्न आहे.
सध्या प्रशासकिय कामकाजामध्ये जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय अशी अवस्था झाली आहे, कोणाचेच कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. हुकुमशाहीचा नमुना म्हणजे सातारा जिल्हा परिषद असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वसामान्य बहुजन समाजातील कर्मचारी व अधिकारी यांचे वर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रशासक असणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मालक न बनता संविधानीक काम करावे.–महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार, संस्थापक अध्यक्ष युवा राज्य फौडेशन
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सातारा जिल्हा परिषद ची तपासणी करून प्रतिनियुक्ती बाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे . अन्यथा बेकायदेशीर प्रतिनियुक्ती बाबत मोठे जन आंदोलन उभे राहील–तुषार मोतलिंग जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी सातारा
सातारा जिल्हा परिषदेतील कारभार हा खिल्लारे शाहीच्या जखडात अडकलेला आहे. जिल्हा परिषदेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या बाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश बरेच वर्ष ठाण मांडून बसलेले प्रतिनियुक्तीवर असलेल्या बदल्यांबाबत त्या नियुक्त्या रद्द करणे साठी केवळ कागदोपत्री आदेश काढलेले आहेत. परंतु वास्तविक तो आदेश केवळ कागदावरच आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नाही. या या सर्व प्रकरणांमध्ये केवळ आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा उद्देश जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी खाते प्रमुख तसेच याच्या मूळ तळाशी असलेले जिल्हा परिषदेचे कार्यकारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांचे कामकाजाची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या देखील आजपर्यंत रोखलेले आहेत. ही बाब मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. त्याबाबत देखील गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अन्यथा या दोन्ही प्रकाराच्या विरोधात आम्हाला तीव्र असे आंदोलन छेडावे लागेल याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी.–अरुण पवार कार्याध्यक्ष भिमशक्ती संघटना सातारा