कळंब प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत चाललेला विळखा यांमुळे नागरिकांत घबराटीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . कोरोना व्हायरसचा दिवसागणिक वाढत चाललेला प्रभाव पाहता सर्वांनी सरकारी नियमांचे पालन करावे. प्रशासनाने दिलेले आदेश गांभीर्याने पाळत घरातच सुरक्षित राहवे. दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाग्रस्तांचा आकडा पाहता काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करा , असे आवाहन राजवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेला केले आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छता पाळा, गर्दी टाळा, खोकताना, शिंकताना, नाक-तोंडावर रूमाल धरा, वारंवार हात स्वच्छ धुवा, घरातीलच अन्न पदार्थ खाणे यांसारख्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच इंदापूरमधील जनतेने घाबरून न जाता जाकरूक राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात गावोगावी जाऊन नागरिकांना धीर देण्याचे काम राजवर्धन पाटील करीत आहेत .