महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बारामती
जगप्रसिद्ध थोर साहित्यिक,साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शंभरावा जयंती महोत्सव विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून आनंदात साजरा करण्यात आला. करोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत समाज बांधवांनी गुरव घरी बोलावून अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साधेपणाने, अभिवादन करण्यात केले.
बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत,साळवे नगर व कसबा साठेनगर या भागा मध्ये सकाळी अण्णाभाऊंना अभिवादन व पूजापाठाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू मांढरे, रिपाईचे पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष बापूराव शेंडगे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ, मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष राजू मांढरे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय तेलंगे व नितीन शेलार, प्राध्यापक इंगळे सर, संपादक दशरथ मांढरे, उमेश दुबे, संदीप साबळे, निलेश जाधव तसेच रिपाईचे उमेश शिंदे, गणेश शिंदे , रोहित सोनवणे, साठे नगर येथे माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, अँड अमृत नेटके, लहुजी शक्ती सेनेचे पप्पू भिसे, सोमनाथ पाटोळे, अमोल इंगळे, विजय नेटके आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बारामती शहरात आणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दीडशे किलो लाडूचे वाटप करण्यात आले. तसेच पुस्तकांचे वाटप करून शहरात एक घर एक झाड या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जमलेल्या सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या जीवनचरित्राचा आपल्या मनोगतातून आढावा घेऊन अभिवादन केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना शासनाने त्वरित भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, बारामती शहरात अण्णाभाऊ साठे यांचे यथोचित स्मारक व पूर्णाकृती पुतळा स्वतंत्रपणे उभा करावा. महाराष्ट्र सरकारने मातंग समाजाकरता दरवर्षी एक हजार उद्योजक निर्माण होणे करता कृती आराखडा तयार करून कार्यवाही करावी. आदी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करून समाज बांधवांनी या सर्व मागण्या न केल्यास आंदोलन करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जाधव यांनी तर आभार किरण बोराडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉ.विजय भिसे, विक्रम लांडगे ,प्रकाश आडागळे ,दिलीप सोनवणे, श्री मांडले, मोहन सुतार आदी उपस्थित होते.