महाराष्ट्र न्यूज फलटण शहर प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले :
पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दि. ५ ऑगस्ट रोजी आयोध्या नगरीत श्रीराम मंदिराचा शिलान्यास माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला. या पावन उत्सवानिमित्त देशभरात नमो नमो मोर्चा भारत या राष्ट्रप्रथम विचाराने प्रेरित सामाजिक संघटना मार्फत महिला शक्तीला प्रोत्साहन देणे व नारीशक्ती सन्माना करिता “राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे आयोजन हे नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय मुख्य समन्वयक श्री. सोपान उंडे पाटील यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय संयोजक श्री. सत्यप्रकाश सिंह, राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. विजयजी हटवार व राष्ट्रीय महिला महासचिव सौ. राजेश्री कक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.देशभरातून नमो नमो मोर्चा भारतच्या महिला, युवती व पुरुष पदाधिकाऱ्यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच घर-अंगण, मंदिर परिसरामध्ये सजावट, रोषणाई, रांगोळी, भगवे झेंडे व पताका लावून नागरिकांना मिठाई वाटून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.
देशभरातून नारी शक्ती सन्माना करिता आयोजित राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेत महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम, तेलंगणा, कर्नाटक राज्यांमधील शेकडो युवती महिलांनी या राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेसाठी युवती व महिलांनी रांगोळी काढून विविध पारंपारिक वेशभूषेत परिसरात व घरात दिवे लावून मिठाई भरवून मोठ्या आनंदात दीपोत्सव साजरा केला होता.
सदर दीपोत्सवाचे फोटो नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेश आयोजन समितीला पाठवण्यात आले होते. १५ ऑगस्टला प्रत्येक राज्यातून ३ व त्यामधून राष्ट्रीय पातळीवरील अंतिम ४ विजेते घोषित करण्यात आले. या राष्ट्रीय दीपोत्सव स्पर्धेसाठी पुणे जिल्हाध्यक्षा सौ. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र प्रांत मधून.. प्रथम क्रमांक- कु. श्रद्धा शिंदेद्वितीय क्रमांक- सौ.प्रमिला मठपती/ नेहा गोरे तृतीय क्रमांक- सौ. सविता वर्मा/ रोहिनी खेडेकरचतुर्थ क्रमांक- रेश्मा शेख यांनी मिळविला.
देशभरातून जवळपास ९०० च्या वर युवती व महिलांचे फोटो स्पर्धेसाठीआले होते. त्यात राष्ट्रीय निवड समितीने खालील विजेत्यांची निवड केली आहे. त्यात राष्ट्रीय महाविजेते म्हणून *प्रथम क्रमांक- सौ. जयश्री धनगव्हाळ ग्रुप- धुळे महाराष्ट्र,*द्वितीय क्रमांक- श्रीमती मीना मुर्ती ग्रुप- राजस्थान व श्रीमती इंदू सिंह गृप- उत्तर प्रदेश, *तिसरा क्रमांक- सौ. कविता शेंदरे/ ललिता रोकडे- नरखेड महाराष्ट्र तर *चौथा क्रमांक- कु. अंजना दास- छत्तीसगडयांची निवड करण्यात आली. सर्व विजेत्यांना नमो नमो मोर्चा भारत राष्ट्रीय कार्यकारणी मार्फत महाराष्ट्रीयन ९ वार पैठणी साडी भेट देऊन प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. प्रतियोगीता यशस्वीतेसाठी सौ. पायल जैन, सौ. मोनिका सुर्यवंशी, विजय जोंधळे व मृणाली डहाणूकर यांनी विशेष परिश्रम घेतले . अशी माहिती नमो नमो मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.