महाराष्ट्र न्यूज बिदाल प्रतिनिधी :
धनगर समाज सेवा संस्थापक नवनाथ ढगे व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तात्रय चोरमले यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी येथे तहसीलदारांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे विविध मागण्या करण्यात आले आहेत.
यावेळी माण तालुकाध्यक्ष दत्तात्रय दडस बोलताना म्हणाले धनगर समाज आरक्षणावरून आक्रमक झाला असताना समाजातील कोणत्याही नेत्यांशी बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. धनगर समाजाला दुजाभावाची वागणूक सरकारकडून मिळत आहे.
सरकारमधील काही नेते जेव्हा विरोधात होते तेव्हा धनगर समाजाचा पुळका घेऊन त्यांनी विधानसभेत धनगरी वेशभूषेत आरक्षणाची मागणी केली होती. सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समाजाची फसवणूक करत आहे .यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे बोलताना म्हणाले आदिवासींप्रमाणे आरक्षणाचा लाभ मिळणे हा धनगरांचा अधिकार आहे. राज्य सरकारने गेल्या दहा महिन्यांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले.असे मत व्यक्त केले.
या निवेदनामध्ये विविध मागण्या धनगर समाजाचा घटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची त्वरीत अमलबजा वणी करणे ,मुंबई उच्च न्यायालयात याच साठी धनगर समाजाचा वतीने दाखल याचिकेची सुनावणी जलदगती न्यायालयात ह्वावी. मागील सरकारने धनगरासाठी जाहीर केलेल्या आदिवासी च्या सवलती त्वरीत लागू करून मंजूर केलेल्या 1 हजार कोटी रुपयां च्या निधीची तत्काळ तरतुद करावी या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी धनगर समाज सेवा संस्था माण तालुकाध्यक्ष दत्तात्रय दडस, उपाध्यक्ष चंद्रशेखर काळे मल्हारी काळे ,आण्णाभाऊ काळे,सागर शेंबडे,अशोक खरात,लक्ष्मण जगदाळे,शंकर खरात, प्रवीण बनसोडे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.