महाराष्ट्र न्यूज सातारा प्रतिनिधी :सातारा जिल्ह्यामध्ये 879 ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रम जाहीर झालेला असून. त्या सर्व ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत झालेली नसून सर्व ग्रामपंचायती संभ्रमावस्थेत असल्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण कोणत्या कॅटेगरीत आहे याबाबतची माहिती नसल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मध्ये गोंधळाचे वातावरण झाले असून, आरक्षणाशिवाय निवडणूक लढवणे म्हणजे डोळे बांधून तिर मारल्याप्रमाणे ग्रामस्थांना जाणीव होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये यावरून असंतोषाचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णयला मोठा अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लोकशाहीला बाधा पोहोचत आहे. ग्रामपंचायती लोकशाहीचा पाया मानला जात असून त्यावर ते घाला घालण्याचे काम निवडणूक प्रक्रिया कडून होत आहे.
या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत बहिष्कार घालण्याचे तयारीत आहेत निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होणार नाही तसा याला जबाबदार कोण तरी वरील निर्णयाच्या गांभीर्याने विचार करून माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी आदेश करून २३/१२/२०२० पूर्वी सरपंच आरक्षण सोडत जाहीर करावे अशा पद्धतीचे निवेदन सरपंच परिषदेचे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने श्री संजय रामचंद्र शेलार सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तसेच तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे ,आनंदराव जाधव प्रभारी जिल्हाध्यक्ष अडवोकेट अनिल सोनमुळे तालुका अध्यक्ष, अरुण कापसे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र व विविध सरपंच यांनी येऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे दिले या प्रकारचं निवेदन दिलं