सुनील निंबाळकर / बारामती : बारामती ता.०९-: होळ ता.बारामती येथे ‘बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य’ या शाखेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल तात्या धिवार यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी होळ गावच्या विध्यमान उपसरपंच सुजाता भिसे,नंदिनी नानासाहेब मदने,लता वाघमारे, अलका शेडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पुजन करण्यात आले.यावेळी सुनिल तात्या धिवार बोलताना असे म्हणाले की, आजची तरुण पिढी सर्वात जास्त मोबाइल च्या आहारी गेली आहे. मोबाईल जेवढा फायदाचा आहे तेवढा तोट्या चा पण आहे त्यामुळे युवकांनी त्याकडे लक्ष न देता शिक्षणाकडे लक्ष द्यावे.नोकरी च करावे असे काही नाही ज्याला शेती आहे त्यांनी शेती करावी.
छोटे छोटे यवसाय करून आपली प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष दयावे
तरुणांनी आपल्या स्वतः च्या घरातून संष्कार घेऊन आई वडिलांची सेवा करावी,आपणच आपल्या घरातील लोकांचा आदर केला पाहिजे..
आपण च आपले स्वतः चे घर सुधारावले तर आपला देश सुधारायला वेळ लागणार नाही।
तसेच युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये
आपण ही संघटनेची शाखा काढण्याचा एक उद्धेश असा आहे की ही संघटना राजकारण न करता फक्त आणि फक्त समाजकार्य करण्यासाठी अहोरात्र काम करत असते
लोकांच्या अडीअडचणी साठी सदैव मी तत्पर राहील असे बोलताना शेवटी सागितले .
तरुण पिढीला समजेल असे मार्मिक मार्गदर्शन केले.
यावेळी होळ गावातील काही कर्तृत्ववान कार्यकर्त्याच्या निवडी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आल्या..
यामध्ये पांडुरंग घळगे यांची बारामती तालुका कार्याध्यक्ष पदी,सेतुराज होळकर याची सहसचिव बारामती तालुका,संदीप कांबळे बारामती तालुका संघटक पदी,संकेत भिसे सोशल मीडिया,विजय भंडलकर शाखा अध्यक्ष होळ,उपाध्यक्ष मोगल होळकर,यांच्या निवडी करण्यात आल्या..
यावेळी प्रमुख उपस्थिती कैलास जी धिवार,पैलवान नानासाहेब मदने,संतोष डुबल,अमोल गायकवाड,अक्षय चाचर,सुरज धेंडे,सचिन गायकवाड,हिंदुराव सोरटे,तानाजी गायकवाड,मामा गाडे,गणी भाई शेख,मुन्ना खोमणे,विध्यमान सदस्य दिपक वाघ,रमेश वायाळ,हनुमंत भंडलकर,महादेव होळकर,वसंत जाधव,विजय वाघमारे,नामदेव भिसे,महेंद्र भंडलकर,पांडुरंग घळगे,बबन भंडलकर,तसेच शाखेचे सर्व पदाधिकारी,सदस्य ,महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्तविक अमोल गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन आकाश वाघमारे यांनी केलं तर चि.सेतुराज होळकर यांनी आभार मानले.