सर्वत्र धर्मवीर बलिदान मास युवक वर्गातून मोठ्या उत्साहात केला जात आहे. हिंदू धर्मातील सर्वांनी बलिदान मास का पाळावे व धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय : स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराजांना कूटनीती ने औरंगजेबाने पकडले व त्यांचा ४० दिवस छळ करून त्यांची हत्या केली तो महिना आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक मानला जातो छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली त्यामुळे आपण तो महिना सुतका चा महिना म्हणून पाळायचा असतो. आपण बलिदान मास का व कशासाठी पाळावा : ज्या स्वराज्यात आज आपण सुखाने राहतो त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जिवाची पर्वा न करता चाळीस दिवस त्रास सहन केल्यावर शेवटी त्यांनी मृत्यूला कवटाळले त्यांनी दिलेले स्वराज्यासाठी बलिदान म्हणून आपण एक महिना श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे आपण हिंदू म्हणून जातो ते फक्त स्वराज्य स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुळे हिंदुस्थानात अनेक हिंदू शूरवीर होऊन गेले परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव काय अमर राहील. त्यांनी दिलेले आपल्या देशासाठी बलिदान यासाठी आपण बलिदान मास पाळावा.
बलिदान मास वाई शहरातील सर्व भागांमध्ये तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये होत आहे.पसरणी, एकसर, व्याहळी, कडेगाव, व्याजवाडी, बावधन, कणूर, दरेवाडी, पाचवड, अमृतवाडी, जांब, लगडवाडी, देगाव, भुईंज, बदेवाडी, वेळे, सुरूर, वहागाव, म्होडेकरवाडी, कवठे, पांडे, बोपेगाव, खानापूर, केंजळ, चांदक, आनंदपूर, शेंदुरजने, बोपर्डी, परखंदी, मुंगशेवाडी, सटालेवाडी, मांढरदेव, मेणवली, भोगाव, धोम, वरखडवाडी, अभेपुरी, वडवली, खावली, वाशिवली, वयगाव, बोरगाव, चिखली, मुगाव, दसवडी, कुसगाव, ओझर्डे, घाडगेवाडी, झगलवाडी यासह अनेक गावांमध्ये दररोज सायंकाळी ७.३० वा. होत असतो
प्रत्येक हिंदूने कौटुंबिक स्तरावर देखील बलिदान मासाचे आचरण करावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुका यांचे मार्फत करण्यात येत आहे.