भोर प्रतिनिधी
भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर असणाऱ्या नीरा नदीवरील सारोळा पुलावर खटावच्या २१ वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे तरुणीचे वाचले प्राण भोर तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या तसेच सुसाईड पॉईंट बनलेल्या सारोळा पुलावरून दर एक दोन महिन्याने अशा घटना घडत असतात. एवढ्या घटना घडूनही प्रशासन याबाबत दक्ष नाही, जाणारा जीवनाशी जातो प्रशासन मात्र आपली कागदी घोडे नाचवीत आपल्या जबाबदारीतून मुक्त होतात अशा घटनेतून कुठल्याही प्रकारचा बोध घेतला जात नाही. आशा प्रकरणाची दोन दिवस चर्चा होते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे, याला नेमकं जबाबदार कोण.
आजच्या घटनेत तरुणीची दैव बलवत्तर म्हणून पाण्यात उडी मारून आत्महत्या करणाऱ्या सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीस स्थानिक तरुणांनी सतर्कता बाळगत जीवदान दिले.
सारोळा पुलावरून दुपारच्या दरम्यान एका तरुणीने पुलावरील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शेजारीच काम करणाऱ्या एका परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरने सदरची घटना पाहून स्थानिकांना आवाज दिला. जवळच असणाऱ्या मच्छीमारांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तरुणीचा जीव वाचवला याची माहिती स्थानिक तरुण बंटी धाडवे ,ग्रामपंचायत सदस्य शुभम दळवी, हर्षद बोबडे, साईनाथ धाडवे , मनोज पांगारे, साहील काजी यांना मिळताच घटनास्थळी पोचून या तरुणीस बाहेर काढून प्राथमिक उपचार केले.तात्काळ जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज नाणीज (सद्या कीकवी) यांच्या अॅम्बुलन्स ड्रायव्हर तुळशीराम अहिरे यांच्याशी संपर्क केला गेला. अॅम्बुलन्स तसेच किकवि पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश लडकत व राजेंद्र चव्हाण यांनी वाचविलेल्या तरुणीस किकवी ता. भोर येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या तरुणीवर उपचार सुरू तब्येतीत सुधारणा होत आहे असे पोलिसांकडून सांगण्यात आले.