महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
शिरवडे गावामध्ये वारंवार नागरिकांच्या असुविधा वाढत चाललेले आहे त्यासाठी आज शिरवडे गावातील महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा.
शिरवडे गांव तसं कृष्णा नदीच्या काठावर परंतु या गावातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून नळाच्या पाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.
शिरवडे गावात पाण्यासाठी 24 × 7 योजना होऊनही निम्म्या गावातील नळांना कसलेच पाणी येत नाहि तर कित्येक नळाला 24 तास गळतीचे पाणी सुरू असते. पाण्यातून अळ्या येणे, अस्वच्छ पाणीपुरवठा हे सुरूच आहे. सततच्या चकॉप, लिकेजच्या नावाखाली आजपर्यंत सगळ्यांनीच ग्रामपंचायतची तिजोरी लुटली. गावातील गटर स्वच्छता हि फक्त वर्षातून एकदाच गांवच्या यात्रेवेळी केली जाते.
परंतु गावातील एकाही पुढाऱ्यांला यावर कायमस्वरूपी उपाययोजना करता आल्या नाहित. फक्त निवडणुका लागल्या कि आरोप- प्रत्यारोप करायचे आणि गावातील लोकांची दिशाभूल करून सत्ता मिळवायची हे असंच सुरू आहे.गावातील विठ्ठल वार्ड क्रमांक १ मध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून लोकांच्या नळाला पाणी येत नाहि. याबाबत लोकांनी गावचे सरपंच, पाणी वितरक व ग्रामपंचायत यांच्याकडे तोंडी तक्रारी करूनहि अद्यापपर्यंत पाण्याचा विषय मार्गी लावलेला नाहि. फक्त हो करूयात, करायचं आहे एवढंच उत्तर देऊन दिवस ढकलण्याचे काम सुरू आहे. या वार्डमध्ये बहुतांश लोकं हि बारा बलुतेदार समाजातील त्यामुळे यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणीच लक्ष द्यायला तयार नाहि. तसेच या येथील लोकांना ग्रामपंचायत मधून लागणारे दाखले उतारे हे पाणीपट्टी, घरपट्टी भरल्याशिवाय दिले जात नाहित. त्यामुळे येथील बहुतांश लोकंहि नियमित कर भरणारी तरिही येथील लोकांना ग्रामपंचायत मूलभूत सोयीसुविधा पुरवू शकत नाहि.त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरवडे ग्रामपंचायतवर महिलांनी हंडा मोर्चा काढला. यावेळी ग्रामसेविका ज्योती जाधव मॅडम या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या या सर्व महिलांनी आमचा पाण्याचा प्रश्न मिटेपर्यंत आमच्याकडे कर वसुलीसाठी येऊ नये व आलात तर आम्हि ती भरणार नाहि तसेच आमची दाखले उतारे यासाठी अडवणूक करू नये असा इशारा दिला.
महिलांचा हंडा मोर्चा ग्रामपंचायतवर येणार असल्याची कानकून लागल्यामुळेच सरपंच बाहेरगावी निघून गेले असतील अशी चर्चा महिला करू लागल्या. त्यावेळी ग्रामसेविका मॅडम यांनी येत्या गुरुवारी या विषयांवर सरपंच सर्व सदस्य यांच्याबरोबर चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.