कळंब प्रतिनिधी – शहाजीराजे भोसले :
कोरोनाचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढू लागल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार कळंब – कळंबोली रस्त्यातील नीरा नदीवरील पूल ( पुणे-सोलापूर जिल्ह्याची सीमा ) वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे , अशी माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली .
कळंब – वालचंदनगर पोलिस स्टेशनचे हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा संसर्ग वाढत चालला आहे , त्यामुळे कंटेन्मेंट व बफर झोन मोठ्या प्रमाणात आहे . त्यामुळे वालचंदनगर पोलिसांनी नातेपुते मार्गावरील कळंब – कळंबोली पूल , चिखली बंधारा , कुरवली – कुरबावी पूल , जांब बंधारा , तावशी पूल रा मार्गावरील जिल्ह्याबाहेरील वाहतुक बंद केली आहे .कोणीही पासाविना प्रवेश करेल , त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल , तरी विना पास कोणीही जिल्हा सोडून फिरू नये असे आवाहन वालचंदनगर पोलीसांकडून करण्यात आले आहे.