सासवड प्रतिनिधी
बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार याचे वडील कालकथीत शंकर गोपाळ धिवार(बापु) यांच्या यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण छोटेखानी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला .यावेळी जेष्ठ विधिज्ञ ऍड.भालेराव यांनी बापूंचा जीवनपट उलगडू सांगितला.या वेळी बोलताना ते म्हणाले की
पुरंदर तालुक्यातील खानवडी गावातील आंबेडकरी विचार चळवळीतील जुने जाणते दिवंगत माजी पोलीस अधिकारी परमपुज्य बुद्धवासी शंकरराव गोपाळा धिवार तथा बापु यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन……..!
पुरंदर तालुक्यातील तमाम दिनदुबळ्यांच्या, वंचित,पिडीत बहुजनांच्या व्यथा आणि वेदनांच्या जाणिवेतून त्यांच्या न्याय हक्कांसाठी,सुखासमाधानासाठी आपल्या बहुजन हक्क परिषद या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपले अवघं आयुष्य समर्पित करणारा संवेदनाशील मनाचा बहुआयामी समाजसेवक मा.सुनिलतात्या शंकरराव धिवार हे स्वर्गीय बापुंचे विचारांचा वसा अन् वारसा जपणारे धाकटे सुपुत्र…!
गरीब घरातला जन्म आणि गरीबीचं ओझं डोईवर पेलत जगण्यासाठी संघर्ष करत असताना मोठ्या मेहनतीनं पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून नोकरी मिळाल्यानंतर दोन घासांसाठी रोजचा संघर्ष काहीसा कमी झाला…!
तरी सुध्दा नोकदाराच्या नशिबी असणारी बदली आणि कामाचा ताण….जीवाची.अन्.आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस सज्ज राहून त्यातून वाट्याला येणाऱ्या क्षणांचा काळ आनंदात रुपांतरीत करुन त्याच आनंदात विश्व व्यापून टाकणे…
लेकराबाळांवर मायेची पाखर घालणे…
सारा गाव दिवाळी, दसरा…सगळे सण साजरे करत जीवनाचा आनंद लुटत असताना सामाजिक शांतता आणि कायदा वा सुव्यवस्था राखण्यासाठी पहारा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाट्याला कधीतरी ते आनंदाचे क्षण वाट्याला येणं… !
आपल्या पोलीस दलातील सेवा सन्मानाने पुर्ण करत असताना पत्नी लक्ष्मीबाई यांनी दिलेली मोलाची साथ..साक्षात नावाप्रमाणेच लक्ष्मी ..!
संसाराचं ओझं डोईवर पेलताना तिनं कधीच कुरबुर केली नाही.संसाराचा गाडा ओढताना रस्त्यात येणाऱ्या खाचखळग्यांना चुकवत मुलांना वाढवलं..त्यांना आदर्श जीवनाचे धडे दिले…बापु पोलीस दलातील सेवा पार पाडत असताना सहाय्यक पोलीस फौजदार या अधिकारी पदापर्यंत पदोन्नती मिळविली होती.सेवानिवृत्तीनंतर जीवनातील अनेक कडू गोड प्रसंग बापूंच्या तोंडून ऐकताना मन सुन्न व्हायचं .धिप्पाड शरीरयष्टी,पहाडी आवाज…बोलण्यातील स्पष्टपणा…उतार वयातही आवाजातीला कणखरपणा त्यांच्या तारुण्यातील धाडसी व तडफदार बाणा कसा असेल याची प्रचिती देत होता..!
विश्ववंदनीय,परमपुज्य डाॕ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचारांचा फार मोठा प्रभाव बापुंवर होता.पोलीसातील नोकरीत बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी त्यांना बंदोबस्त ड्युटी करण्याचं भाग्य लाभले होते तो मौल्यवान ठेवा संपुर्ण आयुष्यभर जपला.त्याच विचारांचे संस्कार त्यांनी तात्यांवर केले.उच्च शिक्षण असुनही शेती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करता करता बहुजन समाजातीला दिनदुबळ्यांना,फाटक्या माणसांना नेटका विचार देऊन त्यांना आधार देण्याचे काम करत चल…दुबळ्यांना बळ देत जा…बाबासाहेबांचे विचार अन् बुध्दांचे तत्त्वज्ञान पुढे घेऊन जा…भाकरीबरोबरच माणसाला आदर्श विचारांची गरज आहे…हे संस्कार बापुंनी सुपुत्र सुनिलतात्यांना दिले..बापुंच्या घामाचे मोल सुनिलतात्यांनी जाणले.वडील बापुंचा विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा सुनिलतात्यांनी अगदी मनोभावे पुढे चालविला आहे.वडिलांच्या हयातीमध्ये सुनिलतात्यांनी त्यांची केलेली सेवा सुश्रुषा अगदी श्रावणबाळाचा इतिहास डोळ्यांसमोर उभा करत होती.बाप-मुलाचं ते मुलुखावेगळं प्रेम…एकमेकांशी वागणं बोलणं सगळ्यांनाच हेवा वाटावा असंच…!
सुनिलतात्यांचं आईवडिलांशी हितगुज करणे…कोणत्याही कामासाठी सकाळी घराबाहेर पडताना त्यांचे चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेऊनच घराबाहेर पाऊल ठेवणं….सगळ्या नातलगांच्या गोतावळ्यात बापुंच्या विश्वात सगळेच रमायचे..!
बापु म्हणजे सुनिलतात्यांचे बाप नावाचे विद्यापीठच ..असं म्हणाल्यास अतिशयोक्ती होणार नाही..!
सुनिलतात्यांच्या आयुष्यात मुकनायकाची भूमिका निभावणाऱ्या बापुंच्या संस्कार ,विचारधनावर सुनिलतात्यांनी माणुसकीने माणसाला माणुस जोडत समतेच्या,ममतेच्या,बंधुत्वाच्या विचारांनी जोडलेला प्रचंड मित्रपरिवार पाहून बापुंचा ऊर अभिमानाने भरुन यायचा…!
अखेर चालता बोलता बापुनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला .पण अजूनही बापू मला सोडून गेले नाहीत असे म्हणणारे सुनिलतात्या वडिलांच्या विचारांपासून आजपर्यंत कधीच दूर गेले नाहीत…..
पिता पुत्रांचं नातं खरेच शब्दांत न व्यक्त करता येणारे…!
बापुंना पुन्नश्च एकदा विनम्र अभिवादन…!!
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शशीभाऊ गायकवाड,महात्मा फुले विविध कार्यकारी सोसायटी चे उत्तम धिवार,महापरिवर्तन चॅरिटेबल ट्रस्ट चे कैलास धिवार,ज्ञानदीप धिवार,आबाजी डुबल, संतोष डुबल, प्रतीक धिवार,दीपक धिवार,दुर्गेश धिवार इत्यादी उपस्थिती होते.यावेळी त्रिशर ण पंचशील घेण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली.