वृक्ष संगोपनात ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत
महाराष्ट्र न्यूज सातारा- राहुल ताटे पाटील
पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानवनिर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती घडवून आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. `झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे .एका दिवसात सामान्यत: माणूस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो. एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे. म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो.सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते.सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते.हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.आजच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे टाळा. कापडी पिशव्याचा वापर करा. वृक्षतोड करू नका या साठीच नागठाणे ग्रामपंचायतीने आपल्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड करून एक वेगळे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे . सन २०१५ पासून ग्रामपंचायतीने आजपर्यंत स्पायकस ,मोह्गणी सप्तपर्णी, अशोक, गुलमोहर अशा विविध प्रकारची झाडे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत लावली आहेत. यात विशेष बाब म्हणजे मोहागणी हा उत्पादित वृक्ष असून या झाडाची उंची ३० ते ५० फुट आहे झाडांच्या पानापासून औषध तयार करण्यासाठी वापरतात त्याचे आयुष्मान १०० वर्षाचे असते तसेच जमिनीला सुपीकता येते.
सदरच्या झाडापासून ग्रामपंचायतीला काही वर्षातच उत्पन्न मिळणार आहे गावातील शेतकर्यांच्या बांधावर लागवड करण्यासाठी त्याना आवाहन करून दरवर्षी पावसाळ्या पूर्वी आंबा पेरू नारळ चिक्कू इत्यादी व वड पिंपळ औदुंबर अशी प्रत्येक खातेदाराला त्यांच्या गरजे नुसार झाडे दिली जातात . ग्रामपंचायतीने नागठाणे येथील स्मशान भूमी येथे वृक्ष लागवड केली आहे ग्रामपंचायती ने लागवड केलेले एक हि झाड वाया गेले नाही तसेच नागठाणे ग्रामपंचायतीने झाडास पाणी देण्यासाठी एक पाण्याचा टँकर घेतला आहे. प्रत्येक झाडास संरक्षण कुंपण तयार केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी यासाठी शासकीय विभागाबरोबरच जनतेनेही या कामी सक्रिय योगदान देणे गरजेचे असून गावातील प्रत्येक नागरिकांनी आपापल्या शेतात आणि परिसरात अधिकाधिक झाडे लावून वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करण्यात पुढे यावे, असे आवाहन ग्रामपंचायत नागठाणे यांनी केलेआहे.याकामी दरवर्षी रामकृष्ण विद्या मंदीर व जुनियर कॉलेज सिनियर कॉलेज , जि.प प्राथमिक शाळा येथील विध्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग असतो . या कामी सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे ,गटविकास अधिकारी संजय ढमाळ, विस्तार अधिकारी प्रकाश साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांनी दिली.
पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच वनक्षेत्र वाढण्यासाठी सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे सातारा जिल्ह्या बरोबरच महाराष्ट्रात हि अशी चळवळ उभी रहावी .सरपंच – श्री विष्णू साळुंखे पाटील