महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
नीरा प्रणालीतील भाटघर , गुंजवणी , नीरा देवधर आणि वीर या चारही धरणांतील पाणीसाठा जवळ जवळ गतवर्षी इतकाच झाला आहे. गतवर्षी 99.75 टक्के इतका पाणीसाठा होता. आज तो 97.45 टक्के इतका झाला आहे. नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी ही माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात एकूण 51 मिलिमीटर पावसाची नोंद पाणलोट क्षेत्रात काय झाली आहे. चारही धरणात मिळून आतापर्यंत 4274 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. चारही धरणातील पाणीसाठा 47.10 टीएमसी इतका आहे . भाटघर धरणातून 4200 क्युसेक्स, वीर धरणातून 9774 क्युसेक्स आणि गुंजवणी धरणातून 200 क्युसेक्स, इतका विसर्ग नीरा नदीत चालू आहे. वीर धरणातून नीरा नदीत एकूण साडेअकरा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे.