महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मसूर
गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे भाताचे पीक आडवे झाले असल्यांने कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांचे भात पीकांचे नुकसान झाले आहे.सोयाबीन, भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. काढलेले सोयाबीन व भुइमूग सुकवायचे कसे व ठेवायचे कोठे असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत आहे. तर रब्बी हंगामासाठी लाभदायी ठरणार आहे. ऊस पीका नंतर कराड उत्तरमध्ये भाताचे क्षेत्र बऱ्यापैकी आहे.शेतकरी भाताचे पीक चांगले येण्यासाठी उत्पादन खर्च जास्त करतात.यंदाच्या हंगामात भाताच्या पीकाला वातावण चगले असल्यांने भात पीक चांगले येवून त्याला पोटरे पडले आहेत.गेल्या पाच सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भाताचे पीक पडले असुन काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहत आहे.
हाता तोंडाशी आलेले पीक पाऊसामुळे वाया जाण्याची शक्याता निर्माण झाली आहे.त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या पीकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यांने करपले आहे.रोगाचा प्रार्दुरभाव आणि अतिरिक्त पाऊस या दोहीरी कात्रीत भात उत्पादक शेतकरी सापडला आहे.भारताबरोबरच नगदी पीक असलेल्या उसाची पैकी वारा व पावसामुळे आडवे झाल्याने वसाच्या ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग आदी पिकासाठी भाऊ पाऊस असला तरी रब्बी हंगामातील शाळेत येण्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे अनेक शेतकऱ्यांनी भुईमूग व सोयाबीन काढल्यानंतर शेतात शाळु पेरला होता मात्र गेल्या तीन चार दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे अडपलेने शाळा उघडली की नाही अशी शंका शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.