काय आश्चर्यचकीत झालात ना. हे अशोक सराफ यांचा (बिन कामाचा नवरा) मराठी चित्रपटातील वाक्य नाही तर,
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेले असून या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या बाबतीत जनजागृती करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.शहरी भागातून वाढलेला कोरोना आता ग्रामीण भागात वाडी वस्त्यावर पोहोचलेला दिसून येत आहे. राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून कोरोनावर परिणामकारकरीत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.शासनाला या कामी विविध संस्था आणि सार्वजनिक मंडळे सहकार्य करत आहेत व्हाट्सअप फेसबुक माहिती फलक आणि इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देखील शासन जनजागृती करीत आहे. अशातच ग्रामीण भागात उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या बेंदूर सण देखील याला अपवाद ठरलेला नाही.
बेंदूर सण हा महाराष्ट्र राज्याचा पुरोगामी आणि पारंपरिक सण असून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा सण आहे वर्षभर काळ्यामातीत राबणाऱ्या बैलाविषयी आणि शेतकऱ्याला मदत करणाऱ्या पाळीव प्राण्यांसाठी हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो
यामध्येच आपल्या घरामध्ये असणारे सर्व पाळीव प्राणी यांनाही तो मोठ्या आनंदाने त्यांना सजवून रंगवत असतो.अशा मध्येच एका शेतकऱ्याच्या मुलाने या बेंदूर सणाच्या दिवशी आपल्या म्हैशीला रंगवताना त्यामध्ये कोरोना जनजागृती संदेश लिहिला आहे. एवढ्यावरच न थांबता या म्हैशीची संपूर्ण गावांमध्ये मिरवणूक काढली.अशा पद्धतीने कोरोना जनजागृती केल्यामुळे सातारा परिसरामध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.