जुन्या आठवणींना उजाळा: एकत्र येताच पुन्हा बालपणाचा किलबिलाट सुरु
सामाजिक बांधिलकी : दिवंगत वर्गमित्राच्या मुलीच्या शैक्षणिक फी ला दिले एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत.
पिंपोडे बुद्रुक, ज्या वर्गांत बसून शाळा शिकलो, सरांचा प्रसंगी मारही खाल्ला, काहींची गुणांची स्पर्धा तर काटावर पास होणाऱ्यांची मनांत भरणारी धडकी, ज्या शाळेने पायाभूत शिक्षण दिले. असे अनेक बालपणाचे प्रसंग डोळ्यासमोर तरळले, गेल्या २८ वर्षानंतर पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत, दिवंगत वर्गमित्राच्या जाण्याने त्याच्या मुलीची शैक्षणिक वर्षात फी भरण्याची अडचण निर्माण झाली होती.या परिस्थितीच्या प्रसंगवधानाचे भान राखून फी चे एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करुन, या सर्व वर्गमित्रानीं सामाजिक बांधिलकी जपत १९९४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यानीं स्नेह मेळावा उत्साहात साजरा केला. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालया मधील १९९४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तीर्थक्षेत्र वाई येथील मधुरा गार्डन येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. नोकरी निमित्त परदेशा बरोबर, देशसेवेत कर्तव्य बजवणारे फौजी बांधव, मुंबई, पुणे, गोवा, बेंगलोर या ठिकाणी कार्यरत असणारे आणि व्यस्त जीवन प्रवासातून वेळ काढून तब्बल ५२ माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. प्रारंभी राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात करुन,माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीं परिचय, मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दिवंगत वर्गमित्र प्रवीण भोसले,सरिता सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून वर्गमित्र कै.प्रवीण भोसले याची कन्या कॉम्पुटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.वडिलांच्या अचानक जाण्याने तिची शैक्षणिक फी भरण्याबाबत समस्या निर्माण झाली होती.वर्गमित्रानीं प्रसंगवधानचे भान राखून फी साठी एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करुन सर्व वर्गमित्रानीं एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यानंतर सर्व वर्गमित्रानीं स्नेहभोजन केले. दुपारच्या सत्रामध्ये माजी विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला.माजी विद्यार्थी यांनी गाणी, नृत्य,कविता, संगीत खुर्ची, मराठी- हिंदी गाण्यांच्या भेंड्या, उखाण्यात नांव घेणे. ह्या कार्यक्रमांनीं जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सर्वजण एकत्र येण्याने लहानपणीच्या आठवणीत रमुन गेले होते.एकमेकांची विचारपूस करताच कधी आंनद तर कधी मन हेलवणार्या गोष्टी कानी पडत होत्या तरीही सर्वांच्या सुख दुखात सहभागी होऊन एकमेकांना आधार द्यायचा असा काही निश्चय करुन १९९४ च्या दहावीच्या बॅचचा बनवलेला केक कापून हा अविस्मरणीय क्षण साजरा केला. खरोखरच हे आनंदाचे क्षण आयुष्यभरासाठी शिदोरी ठरेल वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मीनाक्षी जाधव-खोत, आभार जालिंदर सावंत यांनी मानले. स्नेह मेळाव्यासाठी ज्योती लेभे-फाळके, मीना निकम- डेरे आणि प्रशांत अचपळ यांनी विशेष प्रयत्न केले. परतीच्या प्रवासामध्ये एकमेकांना विचारपूस करत होते.
सगळे पुन्हापुन्हा जाण्यासाठी निघत असताना पण गाडीमध्ये कोणाला बसू वाटत न्हवते मन मात्र तिथेच अडकून राहत होते हवाहवासा सहवास वाटत असला तरी घरी जाण्यासाठी निघावे लागणारच होते.आणि शेवटी सर्वजण घरी पोहचले का याचीही विचारपूस होत होती. कोण मोठे कोण लहान हा थोडासाही लवलेश कुणाच्या चेहऱ्यावर नव्हता. सगळे लहान होऊन आनंदाचा क्षण अनुभवत होते सर्वजणानीं गेटटूगेदर केला.ज्या शिक्षकांनीं योगदान दिले त्यांचाही उल्लेख केला. ज्यांना येणे शक्य झाले नाही त्यांच्याही आठवणीत रमून गेले.या स्नेह मेळाव्याने अनेकांना मानसिक ताणतणावातून हलके केले.तर अनेकांना पुन्हा जगण्याची ऊर्जा मिळाली.अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटत होती.