वाई दि.१ जुलै २०२२ स्वर्गीय मा. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त एक जुलै रोजी कृषि दिन व कृषी संजीवनी मोहिमेचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.’ सोयाबीन एकरी 20 ते 22 क्विंटल ‘ हे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागा मार्फत कृषी चिकित्सालय कडेगांव,येथे शेतकऱ्याना मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने दिनांक 01/07/2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता सोयाबीन पीक उत्पादकता वाढ या विषयी शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमास मा. उपविभागीय कृषी अधिकारी वाई श्री. चंद्रकांत गोरड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात मा. उपविभागीय कृषी अधिकारी वाई श्री. चंद्रकांत गोरड यांनी माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करून उत्पादनवाढीवर भर देण्यासतसेच सोयाबीन पिकावर प्रक्रिया उद्योग उभारणी करुन उपपदार्थ निर्मिती करणेस सांगितले. मा.तालुका कृषी अधिकारी वाई श्री. प्रशांत शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. संग्राम पाटील विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी सोयाबीन पिकातील बियाणे निवड,बीजप्रक्रिया,पेरणी पद्धती,तन व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन पिकांच्या वाढीसाठी सल्फर चे महत्व, पीक वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर , व पाणी व्यवस्थापन तसेच काढणी पश्चात व्यवस्थापन या सर्व बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच श्री. भूषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बोरगाव यांनी सोयाबीन पिकाचे एकात्मिक खत व्यवस्थापन व भात पिकातील पिकातील शेवाळ नियंत्रणासाठी रोपे पुनर्लागवड केलेनंतर 20किलो प्रती हेक्टर मोरचूद वापराबाबत बाबत मार्गदर्शन केले. कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री राजेंद्र गायकवाड यांनी सोयाबीन ग्राम बीजोत्पादन व टोकण पद्धतीने सोयाबीन केले बाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास मा. श्री तेजदीप ढगे तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, वाई, सर्व मंडळ कृषी अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक, सर्व कृषी सहाय्यक, ए टी एम व सोयाबीन पिकामध्ये उच्चांकी उत्पादन घेणारे श्री सुनील जगताप, रिसोर्स बँक शेतकरी श्री नितीन वरखडे, व तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकातील शेतकरी उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी.टी.एम. आत्मा श्री प्रदीप देवरे यांनी केले. व शहाजी शिंदे, कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाई यांनी आभार मानले.