पाचगणी प्रतिनिधी (सागर पोफळे ) :- हिंदू धर्मात दिवाळी सण हा महत्त्वाचा आहे तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देखील देवा प्रमाणे लोक मानतात. त्यांच्या मुळे आपण सुखी जीवन जगत आहे तसेच सण साजरे करत आहे. दिपोस्तवानिमित्त महाबळेश्वर तालुक्यात राजपुरी गावातील कार्तिकस्वामीं कला क्रीडा मंडळ राजपुरी मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे. जसें की राजगड,रायगड ,प्रतापगड, रायरेश्वर, असे विविध किल्ले तयार केल आहेत. गौरव राजपूरे, प्रतिक (बबलू), तुशार भिलारे, आदित्य भिलारे ,ऋतिक राजपुरे ,अंकित राजपुरे, राज राजपुरे, आकाश राजपुरे,आशिष पोफळे ,अनुज राजपुरे ,आनंद राजपुरे, प्रणव पोफळे,रोहित राजपूरे, सागर पोफळे, गणेश राजपुरे,प्रतीक राजपुरे(१६००) ,हर्ष राजपुरे, अजिंक्य राजपुरे ,प्रशांत सपकाळ, महेश वरे,मयूर भावळे ,निधी राजपुरे, आराध्या पोफळे, अंकिता राजपुरे, योगिता भावळे ,प्रिया राजपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अतुलनीय इतिहास पराक्रम व विविध गड-किल्ल्यांचे माहिती येणाऱ्या भावी पिढीला समजावी तसेच स्मरणात राहावी आणि महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढीला लक्षात यावा यासाठी दरवर्षी मुले किल्ला बनवून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात. तसे पाहता सातारा जिल्ह्यामध्ये महाराजांचा इतिहास पराक्रमी आहे.मुलांमध्ये ईश्वराकडून आलेली ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता असते.किल्ला घराच्या बाहेरच का बनवतात?घर हे समृद्धि दर्शकतेचे प्रतीक असते. घरासमोर किल्ल्याची निर्मिती केल्यामुळे घराचे रक्षण करण्यासाठी, म्हणजेच घरात असलेल्या धनसमृद्धीला टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या क्षात्रतेजाचे प्रतिनिधित्व करणार्या, किल्ल्याचे नेतृत्व असलेल्या धर्माचरणी राजाशी अभेदता निर्माण करते.