तरडगाव प्रतिनिधी -वैभव जगताप
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य भर १७ आणि १८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड व वाहतूक बंद हे दोन दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे केंद्र,राज्य सरकार व राज्यातील साखर उद्योगाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे
याचा अनुषंगाने स्वाभिमानीच्या संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज फलटण तालुक्यातील स्वराज,श्री दत्त इंडिया,शरयू व श्रीराम जवाहर या कारखान्यांना फलटण तालुक्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी यांनी १७,१८ नोव्हेंबरला ऊसतोड व वाहतूक बंद करावी याचा निवेदनाद्वारे विनंती व इशारा दिला आहे
यावेळी स्वाभिमानीचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर जिल्हा सरचिटणीस डॉ. राजेंद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव,राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, पक्ष तालुका अध्यक्ष दादा जाधव, फलटण शहराध्यक्ष सचिन खानविलकर पक्ष तालुका उपाध्यक्ष शकील सिकंदर मनेर, बाळासाहेब शिपकुले, किसनराव शिंदे शिवाजी सोडमिसे यांनी फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड वाहतूक बंद करण्याचे निवेदन दिले आहे