सातारा शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेले पंचक्रोशीतील बाजारपेठेचे मुख्य गाव ग्रामपंचायत व ग्राम कृती समिती ग्रामस्थ यांच्या चांगल्या नियोजनामुळे तासगाव व पंचक्रोशीतील व्यक्ती आजपर्यंत कोरोना बाधित झालेली नाही. ही परिस्थिती अशीच कायम राहावी म्हणून आणि तासगाव परिसरा शेजारील जिहे,कठापूर, गोजेगाव, चिंचणेर, जैतापूर, कोडोली, धनगरवाडी, इत्यादी गावांमध्ये कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्रामपंचायत ग्राम कृती समिती व ग्रामस्थ यांच्या निर्णयानुसार अनिश्चित काळासाठी गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
हे करत असताना ग्राम कृती समिती बरोबर गावातील तरुणांचा यामध्ये सहभाग उल्लेखनीय आहे.सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत ठीक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती व बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्तींना गावात येऊ न देणे अथवा काही अत्यावश्यक काम असल्यास योग्य त्या खबरदारीचा उपाय घेऊनच त्यांना गावांमध्ये त्यांना प्रवेश मिळणार आहे.त्याच बरोबर चेहऱ्यावर मास्क न लावणे उघड्यावर केव्हा सार्वजनिक जागेत थुंकणे अथवा समूहाने विनाकारण गर्दी करणे असे आढळल्यास प्रशासनाने ठरवून दिलेल्या दंड वसूल करण्याचे काम ग्राम कृती समिती करणार आहे.
ग्रामपंचायत ग्राम कृती समिती व ग्रामस्थ यांचा योग्य समन्वय असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय हा आम्ही आज अखेर चांगल्या पद्धतीने गावपातळीवर राबवत आहोत.गावातील ग्रामस्थ प्रशासनाला योग्य ते सहकार्य करत आहेत.श्री भिमराव ताटे.
सरपंच अध्यक्ष ग्राम कृती समिती,
ग्रामपंचायत तासगाव