महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील ग्रामसुरक्षा दलाकडून निरा नदीच्या पाञातील पाणी ज्या घरात गेले होते , त्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप वालचंदनगर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले .
निमसाखर येथील खंडोबानगर या ठिकाणच्या काही घरामध्ये निरा नदी पाञातील पाणी शिरले होते . यामुळे या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे व सामानांचे नुकसान झाले होते .
नुकसानग्रस्त कुटुंबियांना ग्रामसुक्षादलाच्या सहकार्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप वालचंदनगर पोलीस स्टेशनचे साहाय्य पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते म्हणाले की , गेले अनेक महिन्यांपासून कोरोनाची साथ चालू आहे . तसेच मागील काही दिवसांपासून आपल्या परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे . यामुळे अनेक शेतकरी यांच्या शेतातील विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या बरोबरच अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे व नदीच्या पुराचे पाणी गेले असल्याने खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . अशा काळात निमसाखर येथील ग्रामसुक्षादलाच्या युवकांनी सामाजिक कार्य म्हणून नुकसानग्रस्तांना केलेली मदत कौतुकास्पद आहे . हा सामाजिक उपक्रम खुप चांगला असून निमसाखर येथील ग्रामसुक्षादला च्या या कार्याचे कौतुक केले .
यावेळी निमसाखर येथील ग्रामसुक्षादलाचे शेखर पानसरे , सोनू चौधरी , संदिप दरेकर , अनिल कारंडे , संदिप सोलकर , गणेश सातपुते , विनोद भोसले , आमोल जाधव , तसेच राजेंद्र पवार , सुनिल कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते .