महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
राष्ट्रीय काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश निवडणूक समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आणि महाविकास आघाडीचे शिक्षक व पदवीधर चे उमेदवार विजयी झालेबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रणजितसिंह देशमुख यांचे विशेष अभिनंदन केले असून रणजितसिंह देशमुख यांच्या माध्यमातून खटाव व माण तालुक्यातील औद्योगिक सहकार व विविध विकास कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने होतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हरणाई सहकारी सूतगिरणी याचबरोबर नियोजित साखर कारखान्याच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेला न्याय देण्यासाठी रणजितसिंह देशमुख हे गेली २५ वर्षे प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना औद्योगिक विचार देण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे. तसेच रणजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये हे पुन्हा सक्रिय होण्याचा घेतलेला निर्णय हा काँग्रेस पक्षासाठी खूप हिताचा ठरणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद यासारख्या निवडणुकांमध्ये हे काँग्रेस पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला .