राज्यभाषा दिनानिमित्त मुधोजी महाविद्यालय फलटण, पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि ऍग्रोवन न्युज परिवार धर्मादाय संस्था फलटण यांच्या संयुक्त विध्यमाने 27 फेब्रुवारी 22 रोजी पाचवे एक दिवसीय धर्मवीर संभाजी महाराज राज्य स्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्राचार्य पंढरीनाथ कदम यांनी दिली आहे.
त्यानुसार संत साहित्याचे गाढे अभ्यासक माजी प्रा. विश्वासराव देशमुख हे या संमेलनाचे उद्घाटक असून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या संमेलनाचे संयोजक ऍग्रोवन न्युज चे प्रकाश सस्ते व स्थानिक संयोजक प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम हे करीत आहेत. कार्याध्यक्ष मा. उपप्राचार्य महादेव गुंजवटे आहेत. या एक दिवसीय साहित्य संमेलनात परिसंवाद, काव्यवाचन,प्रकट मुलाखत, कथाकथन इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य जीवनगौरव पुरस्कार पाचगणीचे साहित्य जगन्नाथराव शिंदे आणि राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कारफलटण तालुक्यातील विंचुरणी येथील सौ.उज्वला रणजित निंबाळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे असून त्यादिवशी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत,
गतवर्षी कोरोना योद्ध्यांना समर्पित केलेली महाराष्ट्रातील एकमेव साहित्य संमेलन फलटण येथे संपन्न झाले. त्यावेळी डॉक्टर, पोलीस ,परिचारिका, सफाई कामगार, ग्रामसेवक, अशा सेविका, यांना म्हणून सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक चित्रकला स्पर्धा, खुल्या गटासाठी निबंध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या साहित्य संमेलनात पुरस्कारासाठी अनेक साहित्यकृती उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील 20 सन्मानार्थी लेखकांना या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच कोरोना चे नियम पाळून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषणम् व इतर ग्रंथांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाचे आयोजन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे साहित्य नगरीत होणार असून सर्व रसिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन साहित्य संमेलनाची निमंत्रक प्रा. डॉ प्रभाकर पवार यांनी केले आहे. मुधोजी राजे विचार मंचावर या संमेलनाचे आयोजित करण्यात आले असून त्या परिसराला मालोजीराजे साहित्य नगरी असे नाव देण्यात आलेले आहे.