कोरोनामुळे शेतीसह अन्य व्यवसाय आर्थिक अडचणीत आले : प्रा. डॉ. जी.एस. पट्टेबहादूर पाटण : भारत हा शेतीप्रधान देश असून बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. या कोरोनाच्या महामारीच्या संकटात शेतीवर व शेतकऱ्यांच्या जीवनावर अनेक बरे वाईट परिणाम झाले आहेत. कोव्हीड मुळे शेती बरोबरच अनेक व्यवसाय आर्थिक अडचणीत आले आहेत असे मत बाळासाहेब देसाई कॉलेजचे अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गजानन पत्तेबहादूर यांनी व्यक्त केले ते कोयनानगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत अर्थशास्त्र विभाग आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र जुनियर कॉलेजचे चे प्राचार्य एम.जे. गिरीगोसावी हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ.जी.एस. झुळझुळे, प्रा. श्रीगणेश गायकवाड व अग्रणी महाविद्यालय समिती निमंत्रक प्रा.अमोल माने हे होते.कोयना शिक्षण संस्था, पाटण संचलित कला वाणिज्य महाविद्यालय कोयनानगर या ठिकाणी अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत अर्थाशास्र विभागामार्फत ‘कोव्हीड चे व्यवसायावरील परिणाम – विशेषता शेती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रा. ए.जी. माने यांनी प्रास्ताविक केले त्यामध्ये ते म्हणाले की,महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी व त्यांच्यामध्ये जाणीव जागृती होण्यासाठी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम घेतले जातात याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला पाहिजे.त्यानंतर प्रा. रोहन क्षीरसागर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
त्यानंतर प्रा.डॉ. पट्टेबहादूर यांनी आपल्या भाषणात कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर झालेले परिणाम याविषयी माहिती दिली. एकूणच कोरोनानाने प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक व्यवसायावर परिणाम केला आहे. अगोदरच शेतीची बिकट अवस्था सुरु आहे शेतमालाला भाव मिळत नाही, अवकाळी पाऊस, खते, बी-बियाणे याबरोबरच कोरोनाचे संकट आले परंतु आता यामधून शेतकरी सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर प्राचार्य डॉ. जी.एस. झुळझुळे यांनी आपल्या मनोगतात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यासाठी कोणकोणते उपक्रम घेतले जातात याची माहिती दिली. तसेच अजून कोरोनापासून आपण मुक्त झालो नाही तरी सर्वांनी जबाबदारीने काळजी घेणे आवश्यक आहे. असे मत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गिरीगोसावी यांनी कोरोनाचा शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम थोडक्यात सांगितला यामध्ये ऑनलाईन शिक्षणाचा ग्रामीण भागातील फारसा प्रभाव पडला नाही प्रत्येकाकडे मोबाईल नव्हते तर काही ठिकाणी रेंज नव्हती परंतु कोयना शिक्षण संस्थेने शाळा बंद शिक्षण सुरु यामध्ये गावोगावी जावून कोरोनाचे निकष पाळून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरु ठेवले. तसेच कॉलेज मध्ये विविध उपक्रम चालू असतात ते विद्यार्थ्यांच्या साठीच असतात त्याचा फायदा करून घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी बी.ए.भाग ३ ची विद्यार्थिनी कु. अंकिता ढमाल हिने आभार मानले तर सूत्रसंचालनाची धुरा प्रा. आर.आर. शेख व प्रा.सौ. एन.आर कुंभार यांनी सांभाळली. या कार्यशाळेस प्रा.सौ. दिपाली लोहार, प्रा.सौ. वैशाली घाडगे,प्रा.कु. पूनम लाड यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.