महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
ग्राहकांचे सर्वांगीण हित आणि सुरक्षेसाठी देशपातळीवर व्यापक काम करणाऱ्या “अखिल भारतीय ग्राहक हक्क संरक्षण परिषद” सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून श्री कैलास सोपान थोरवडे यांची निवड करण्यात आली आहे.
देशात ग्राहकांच्या हितासाठी विविध कायदे पारित करण्यात आले आहे तरीही ग्राहक म्हणून नागरिकांचे दैनंदिन समाज जीवनात अनेक क्षेत्रात फसवणुकीचे प्रकार होत आहेत यासाठीच राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सागर प्रकाश घाडगे विविध स्तरावर ग्राहकांची हित, त्यांना असणारे कायदेशीर संरक्षण तसेच विविध शासकीय आस्थापनांसोबत समन्वय साधत नागरिकांचे प्रबोधन सातत्यपूर्ण करीत आहेत. आज समाज जीवनात खाजगी आस्थापना सोबत थोड्याफार फरकाने रेल्वे, बस, टेलिफोन, पोस्ट तसेच विमा, बँका, वीज मंडळे आधी सरकारी सेवां बाबतही दिरंगाई , अकार्यक्षमसेवा बाबत नागरिकांची नाराजी वाढत असून याबाबत ग्राहकांच्या हितासाठी शासन स्तरावर प्रयत्न होऊन ग्राहक हक्क संरक्षण कायद्यासमवेत माहितीचा अधिकार, जनलोकपाल, बँक लोकपाल कायदे सुद्धा पारित करण्यात आले आहेत याची माहिती ग्राहकांना व्हावी तसेच विभागवार आढावा घेण्यासाठी ग्राहक दिनाच्या औचीत्याने संपन्न बैठकीत श्री कैलास सोपान थोरवडे यांची निवड करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्यात सामाजिक कार्यातून विविध सरकारी तसेच सामाजिक संस्था संघटनांशी निगडित असणारे समन्वय साधणारे व्यक्तिमत्व म्हणून श्री. कैलास थोरवडे यांची ओळख आहे. त्यांच्या ग्राहक हिताची व सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र अध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी त्यांची निवड साजरा जिल्हाध्यक्ष म्हणून केली आहे.
श्री कैलास थोरवडे यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात व्यापक प्रमाणात ग्राहक ही त्याची चळवळ राबवली जाईल असा विश्वास व्यक्त करून राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सागर प्रकाश घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच राज्य खजिनदार श्री. रवी आहिरे, जनरल सेक्रेटरी श्री. अमित जाधव तसेच राज्य अध्यक्ष श्री. नितीन काळे आणि राज्य उपाध्यक्ष ॲड. पंडीत गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
































