सातारा – जि प आर्थिक पतसंस्था ही जिल्हा परिषदेच्या कर्मच्याऱ्याच्या राजकारणातील अर्थवाहिणी आहे ज्याच्या हातात ही पतसंस्था तो जि प . मध्ये अधिराज्य करत असतो हा आत्ता पर्यंतचा इतिहास आहे . पण सध्या या बाबतीत बऱ्याच नाट्यमय घडामोडी सध्या घडलेल्या आहेत दि २८ एप्रील रोजी छाननी प्रक्रिये दरम्यान चंद्रकांत तायडे यांनी’ अक्षेप नोदवून ४७ नामनिर्देशन अर्ज अपात्र ठरवले . सदर बाबत निवडणुक निर्णय अधिकारी श्री मोहिते यांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला असला तरी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विचार करून सदरचे ४७ अर्ज बाद होणार आहेत . मात्र निवडणुक निर्णय अधिकारी यांनी ३ – ४ दिवस सदरचा निकाल राखुन का ठेवला ? याबाबत सहकार विभागाकडे उत्तर नाही . येत्या २ मे रोजी उच्च न्यायालय मुंबई यांच्या निकालास अधिन राहुन सदरचा निकाल निवडणुक निर्णय अधिकारी निर्णय घेतील’ . प्रत्यक्षात उच्च न्यायालयाचा निकाल जैसे थे न ठेवता बदल केला तर ती उच्च न्यायालयाची बेअदबी ठरेल . म्हणुन किती राजकीय दबाब सहकार विभागावर आला तरी सहकार विभाग उच्च न्यायालयाचा निकाल जैसे ठेवून ४७ अर्ज अपात्र ठरवुन एतिहासीक निर्णय दिला जाईल असा जानकारांचे मत आहे .