दहिवडी : ता.१४
गेल्या काही दिवसात सागर पोळ यांनी भाजपच्या गोटात शिरत राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडवून दिली होती.काही दिवसापूर्वी पाणी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पाणी योजनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच कलगी तुरा रंगलेला समस्त दहिवडीकर आणि तालुका वासीयांनी पाहिला होता. त्यावेळी सागर पोळ यांनी भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावत राष्ट्रवादीच्या पाणीपूजन कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवत त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतरही सागर पोळ यांना कालपर्यंत भाजपच्याच गोटात सर्वसामान्य दहिवडीकरांनी पाहिले आहे.
नगराध्यक्ष सागर पोळ हे भाजपवासी होणार की काय? अशीच चिन्हे जवळपास निर्माण झाली होती. दहिवडी नगरपंचायतीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स, माझी वसुंधरा गार्डन, रस्ते व विविध विकासकामांच्या १५ कोटी रुपयांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मात्र अप्रत्यक्षरित्या भाजपच्या गोटात असलेल्या
सागर पोळ यांनी हजेरी लावल्याने त्यांचे राष्ट्रवादीसोबत मनोमीलन कधी झाले? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.