प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्यासोबतच जुलै 2020 पासून 1 किलो मोफत डाळ मिळत आहे. ती योजना आता नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार असल्याचं सरकारने म्हटले आहे.ही केंद्र शासनाची योजना असल्याने अन्नधान्याबरोबर अख्खा हरभरा देण्याची योजना केंद्राने आखली होती.
परंतु अनेक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी अख्ख्या हरभऱ्याऐवजी चणाडाळ/तूर डाळ वितरणाची मागणी केली होती. राज्य शासनाने केंद्राला अभिप्राय कळविल्यानंतर राज्यासाठी हरभरा किंवा तूरडाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला.