महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी : खटाव
खटाव तालुक्यातील मायणी दुरक्षेत्र हद्दीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या अशोका लेलंड पिकअप व चालकावर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मायणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि 12 (रविवार)पहाटे साडेपाचच्या सुमारास भिकवडी बाजूकडून विखळे गावच्या दिशेने एक वाळूने भरलेला पिकअप येत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. देशमुख यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या. सदर पथक हे विखळे गावच्या दिशेने
जाणाऱ्या चौकात सापळा रचून थांबले असता एक पिकअप भिकवडी बाजूकडून येताना दिसला. पिकअप थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे दिसून आले. चालकाला परवानाबाबत विचारणा केली असता चालकाने परवाना नसल्याचे सांगितले. पोलिसांनी तात्काळ पिकअप क्र एम एच 10 -CR- 5287 व अर्धा ब्रास वाळू असा एकूण पाच लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक बालाजी लक्ष्मण सुर्यवंशी (वय 28 वर्षे रा. माऊली ता. खानापूर जि. सांगली) याला ताब्यात घेऊन भा द वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक खांडेकर करीत आहेत.
सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या सूचनेनुसार पो ना खांडेकर, पो कॉ कोळी, पो कॉ सूर्यवंशी, पो कॉ शिरकुळे यांनी केली आहे.