यु. जी. सी., उच्चतंञ शिक्षण, विद्यापिठाच्या परिपञकानुसार फेर निकाल देण्याची मागणी.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे घेण्यात न आलेल्या कायदा विभागाच्या परिक्षांचा संबंधित सञातील विद्यापीठाने जाहिर केलेला निकाल त्यावेळी यूजीसी, उच्चशिक्षण विभाग व संबंधित यंञनेने जारी केलेल्या परिपञकानुसार न लावता त्यामध्ये बहुतांशी विसंगती असल्याने विधी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता असून याबाबत विद्यापीठ व संबंधित विभागाने फेरविचार करून अन्यायकारक निकाल रद्द करून कोविड परिस्थितीमुळे परिक्षा न झालेल्या सञातील विषयांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी विधी शाखेतील विद्यार्थ्यांनी केली असून याबाबतचे निवेदन विद्रोही विद्यार्थ्यी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी शिवाजी विद्यापीठ व कॉलेज प्रशासनाला देण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या विधी शाखेने विद्यार्थ्यांचे मागिल नियमित व प्रलंबित सञातील निकाल जाहिर केले परंतु संबंधित निकाल जाहिर करताना विद्यापीठाने कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीला अनुसरून यूजीसी, उच्च व तंञशिक्षण विभाग व शिवाजी विद्यापीठ यांनी जारी केलेल्या नियमांचे पालन केले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.याबाबत विधी शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी, उच्च शिक्षण विभाग व विद्यापीठ प्रशासनाला संबंधित निकाल रद्द करून सुधारित निकाल जाहिर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की,विद्यापीठाने परिक्षा न घेताच विद्यार्थ्यांचा अनुत्तीर्ण निकाल देणे कितपत योग्य आहे? युजीसी परिपञक परिच्छेद क्रमांक ५ नुसार लगतच्या सञातील परीक्षांच्या निकालावर अधारित सरासरी पध्दतीचा अवलंब करण्याची तरतूद असली तरी १०० गुणांच्या पॅटर्नला ती लागू करणे हा विद्यापीठाचा मनमानी कारभार आहे.
याशिवाय कोविड परिस्थितीमुळे मागील सञाची परिक्षा न घेता विद्यार्थीना पुढील वर्गात पाठविले असून हा निकाल ग्राह्य मानल्यास विद्यार्थ्यांना ब्लॅकलॉक सहित मागिल वर्षाचे व चालू वर्षाचे असे मिळून एका वेळी अंदाजे १५ विषयांचे पेपर सोडवावे लागणार आहेत.यांसह इतर बाबी विद्यार्थ्यांवर लादल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण झाला असून संबंधित विभागांनी सद्य निकाल बदलून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रभावित सञातील विषयात सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे व तसे निकाल पुन्हा जाहिर करावेत अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दरम्यान याबाबत संबंधित विभागांनी त्वरीत सकारात्मक कार्यवाही करावी अन्यथा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यत विविध पध्दतीने निषेधाचे आंदोलन सुरू ठेवणार असल्याची ग्वाही विद्रोही विद्यार्थी संघटनेने दिली आहे.
युजीसी व राज्य शासनाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्याचा निकाल जाहिर केला असून यांमध्ये कोणत्याही ञुटी नसून याबाबत आणखी काही शंका असल्यास संबंधितांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या शंकाचे निरसन करावे
भक्ती नाळे
डेप्युटी रजिस्टार
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
कोविड १९ संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे निकाल देताना लागू केलेली पध्दत अन्यायकारी असून त्यामध्ये बदल करून प्रभावित सञातील विषयांसाठी कोणतेही निकष न लावता सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे.
शुभम ढाले
सदस्य,विद्यार्थी संघटना